मित्रांनो , सध्या
१९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयानक असा दुष्काळ उभ्या महाराष्ट्रात पडलेला आहे.
उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर राजकारण चालू आहे. दुष्काळ
निवारणासाठी packageजाहीर होत आहेत. असही एक मत
आहे कि ७२ चा दुष्काळ हा अन्नधान्याचा दुष्काळ होता आणि सध्या त्या मानाने
अन्नधान्य उपलब्ध आहे परंतु पाण्याचे दुर्भिक्ष मात्र अत्यंत जाणवत आहे. काही
ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती आहे कि घरी आलेल्या पाहुण्यांना खायला जे पाहिजे ते देतो मात्र पाणी मागू नका अशी
विनंती करावी लागत आहे. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर महिन्याकाठी रु.३०००/- +
फक्त पाण्यासाठी खर्च करावे लागत आहेत. दुसऱ्या बाजूला मात्र आर्थिक दृष्ट्या
संपन्न असणारा गट मात्र पाणी आणि पैसा फुटकळ समारंभ आणि मेजावाण्याद्वारे वारेमाप
खर्च करीत आहे. ईतर वेळी कधीच न जाणवणारी ‘पाण्याची किंमत’ आज काळात आहे. एखाद्या
वस्तूची टंचाई निर्माण झाल्याशिवाय त्या वस्तूची खरी किंमत काय हा विचार आपण कधीच
करत नाही. म्हणूनच आज पाण्याची टंचाई निर्माण झालेली असताना पाण्याच्या खऱ्या
किमतीविषयी चर्चा करणे गरजेचे आहे. पाण्याच्या बाबतीत असाच हेळसांड पणा चालू
राहिला तर नक्कीच काही काळाने सगळ्या वस्तूंची किंमत हि पाण्याच्या स्वरुपात
द्यावी लागेल. अहि कोणतीच वस्तू नाही कि जी प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्षपणे
पाण्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही.
तांत्रिक दृष्ट्या, कोणत्याही
वस्तूच्या निर्मितीमागे आवश्यक असलेल्या पाण्याचा हिशोब जेव्हा अभ्यासाद्वारे आकड्यात
मांडली जाते त्यावेळी येणाऱ्या अशा पाण्याच्या स्वरूपातील किमतीला ‘water footprint’
अशी
संकल्पना रूढ आहे. यामध्ये एखादी वस्तू निर्माण होत असताना तिच्या निर्मिती
प्रक्रियेमधील विविध टप्प्यावर अपेक्षित असणाऱ्या पाणीवापराचा हिशोब करून तो
लिटर्स मध्ये मांडला जातो. त्यामध्ये एखाद्या पिकासाठी लागणारे पावसाचे पाणी अथवा
सिंचनाचे पाणी लागते त्याला ‘green water
footprints’ असे म्हणतात, तर ते
पिक पूर्ण हातात येई पर्यंत जे पाणी बश्पिभावानाद्वारे अथवा इतर करणा मुले वाया
जाते त्याला ‘blue water footprint’ असे म्हणतात. आणि त्या पिकाचे रुपांतर शेवटी एखाद्या पदार्थ मध्ये
अथवा ‘product´’ मध्ये होत असतना
जे पाणी प्रदुषित होते त्याला’grey water
footprints’ असे म्हणतात. या
तिन्हींची बेरीज करून त्या पदार्थाचा अथवा वस्तूचा ‘total
water footprint’ या स्वरुपात पाणी वापर काढला जातो.
समजा,आज आपल्या
सकाळच्या एक कप चहाची रुपयातील किंमत आहे रु.८/- परंतु याबरोबरच ‘water
footprint’ म्हणजेच पाण्याच्या
स्वरूपातील किमतीचा जर हिशोब केला तर तो येतो सुमारे १०० लिटर. म्हणजेच एक कप चहा
चा आस्वाद प्रत्यक्ष पणे घेण्यासाठी सुमारे १०० लिटर पेक्षाही जास्त पाणी
अप्रत्यक्ष पणे वापरण्यात आलेले असते. मग यामध्ये अगदी चहासाठी लागणारी साखर,
त्यासाखरेसाठी उसाला लागणारे पाणीवापर प्रत्यक्षपणे तर चहासाठी लागणारे ईतर
निर्मीती प्रक्रियेमध्ये लागणाऱ्या पाण्याचा अप्रत्यक्ष वापर गृहीत धरलेला असतो.
त्याचप्रमाणे एक कप कॉफी साठी सुमारे १4० लिटर, तर एक किलो चिकन मागे सुमारे ७,७३६ लिटर्स इतक्या अवाढव्य
प्रमाणात पाणी लागते. आणि एक किलो
कापसासाठी सुमारे ११००० लिटर्स आणि त्यापासून निर्माण झालेला एक cotton
t-shirt घेतला
तर त्याची पाण्याच्या स्वरूपातील किंमत म्हणजेत ‘water
footprints’ असतात सुमारे २७००
लिटर्स.
म्हणूनच जागतिक
पातळीवर ज्या गोष्टींचे ‘water footprints’ हे जास्त असतात अशा गोष्टी शक्यतो दुसऱ्या देशाकडून आयात करायच्या अशी
संकल्पना रूढ होताना दिसत आहे आणि हे अभ्यासाद्वारे स्पष्ट झालेले आहे की भारत
युरोपियन युनियन देशामध्ये वर्षाकाठी जो कापूस निर्यात करतो त्या कापसाचे
पाण्याच्या स्वरूपातील मूल्य आहे सुमारे ६,६२,३०,००० लाख लिटर्स ‘water footprints’
म्हणजेच ६६२३००००००००० इतके लिटर्स पाणी आपण एक वर्षात कापूस निर्यात
करून युरोपियन युनियन चे वाचवतो. आणि सर्वसाधारण पणे आपण ज्या वस्तू निर्यात करतो
त्या बहुतांश वस्तूंचा ‘water footprints’ हा आपण आयात करत असलेल्या वस्तूंच्या तुलनेत अतिप्रचंड आहे.
आणि सुरुवातीला
उल्लेख केल्याप्रमाने आजच्या टंचाई ग्रस्त काळात जेवा लग्न अथवा ईतर समारंभामध्ये मेजावानिद्वारे
प्रचंड प्रमाणात अन्नाची नासाडी करन्यात येते तेवा फक्त विचार करा कि आपण किती
पाणी वाया घालवतो. त्यामुळेच इथून पुढे ताटात अन्न वाया घालवताना तरी विचार करा कि
आपण अन्न तर वाया घालावातोच पण त्यामागे वापरण्यात आलेले लाखो लिटर्स पाणी सुद्धा
वाया घालवतो. हाच विचार प्रत्येक वेळी डोक्यात आला तर नक्कीच खात्री आहे कि आपण
सगळे पाण्याचा नक्कीच जपून वापर करू. अजून एक महत्वाची गोष्ट अशी कि शाकाहारी
भोजनासाठी लागणारा सरासरी पाणीवापर आहे १५०० लिटर्स प्रती दिन आणि मांसाहारी
भोजनासाठी ३४०० लिटर्स/प्रती दिन. म्हणजेच नुसते शाकाहाराचे आचरण केले तर आपण
निम्यापेक्षा जास्त पाणी वाचवू शकतो, अर्थात निर्णय ज्याचा त्यांनी घ्यायचा....
मतितार्थ एकच,
काहीही करा पण पाणी वाचवा....!! वाया घालवू नका ....!!

0 comments:
Post a Comment